मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “माझं नाव घेतल्याशिवाय काही लोकांचा दिवस सुरू होत नाही आणि संपतही नाही,” असे म्हणत शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधला.
शिंदे पुढे म्हणाले की, विरोधक कितीही टीका, आरोप किंवा आक्रमक भूमिका घेत असले तरी आपण आपल्या कामावर ठाम आहोत. “कोणीही कितीही आदळआपट केली तरी जनतेसाठीचं काम थांबणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.दरम्यान, मुंबईच्या विकासावरून आणि आर्थिक निर्णयांवरून सुरू असलेल्या वादावरही शिंदेंनी सूचक भाष्य केले. राज्याची तिजोरी सुरक्षित असून विकासकामांसाठी निधीचा योग्य वापर केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय टीकेला उत्तर देताना एकनाथ शिंदेंनी संयम राखत, सरकारचे लक्ष कामावरच केंद्रित असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले.














